Corona Virus : मुंबईत जमावबंदी लागू

Corona Virus : मुंबईत जमावबंदी लागू

Corona Virus : मुंबईत जमावबंदी लागू

सध्या महाराष्ट्रात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३२वर पोहचली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १५ मार्चपासून सर्व टूर बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिझनेस आणि पर्यटन टूर रद्द केली आहे. १५ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत ही बंदी कायम असणार आहे. मुंबई पोलिसांनी आदेश काढले असून हे आदेश न पाळल्यास कारवाई होणार आहे.

मुंबई मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊ नये किंवा जाऊ नये याकरिता मुंबई पोलिसांना परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आलं आहे म्हणजे आजपासून मुंबईत कलम १४४ लागू झालेला आहे. त्यानुसार मुंबईत कोणत्याही प्रकारची टूर करण्यावर बंदी घातली आहे. जर खूप महत्त्वाची टूर असले तर मुंबई पोलिसांची परवानगी घेणं गरजेचं असल्याची परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. ३१ मार्चपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

काय आहे कलम १४४?


हेही वाचा – करोना अपडेट – औरंगाबादमध्येही करोना पॉझिटिव्ह रुग्ण!


 

First Published on: March 15, 2020 12:52 PM
Exit mobile version