- शमीला बाद करत अँडरसनने नवा विक्रम केला आहे. कसोटी सामन्यांत तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज झाला आहे.
- शमीला बाद करत अँडरसनने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.
- इशांत आणि जडेजाही झटपट माघारी परतले आहेत.
- रशीदने पंतलाही माघारी पाठवले.
- १४९ धावांवर लोकेश राहुल बाद झाला असून भारताला हा सामना जिंकण्यासाठी अजून १३८ धावांची आवश्यकता आहे.
- रिषभ पंतने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.
- भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने आपल्या कारकिर्दीतील ५ वे शतक झळकावले आहे.
- पाचव्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. सलामीवीर लोकेश राहुलने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले आहे.
- अडखळत्या सुरुवातीनंतर राहुल आणि रहाणेने भारताचा डाव सावरला आहे.
- या संपूर्ण मालिकेप्रमाणेच भारताची सुरूवात अडखळती झाली आहे. भारताने अवघ्या एका धावेत धवन आणि पुजारा यांना गमावले.
- इंग्लंडने आपला दुसरा डाव ८ बाद ४२३ वर घोषित केला आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी ४६४ धावांचे आव्हान आहे.
- सामन्याच्या चौथ्या दिवशी टी पर्यंत इंग्लंडचा स्कोर ६ बाद ३६४ असा आहे.
- शमीने बेरस्टोव आणि जडेजाने बटलरला झटपट माघारी पाठवले आहे.
- हनुमा विहारीने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्याने शतकवीर कूक आणि रूट यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले.
- सामन्यात लन्च ब्रेक झाला असून इंग्लंडची परिस्थिती २४३ वर दोन बाद अशी असून, कूक १०३ आणि रुट ९२ धावांवर खेळत आहे.
- आपला शेवटचा सामना खेळत असलेल्या कूकने आपले शतक पूर्ण केले असून तो १०१ धावांवर खेळत आहे तर कर्णधार रूट ८० धावांवर खेळत आहे.
- दुसऱ्या डावातही कूकने अर्धशतक पूर्ण केले असून तो सध्या ५६ धावांवर खेळत आहे.
- भारताचा पहिला डाव २९२ धावांवर संपल्यानंतर आता इंग्लंड आपला दुसरा डाव खेळत आहे. सध्या इंग्लंडची अवस्था १२६ वर दोन बाद अशी आहे.
- हनुमा विहारी ५६ धावांवर बाद झाल्यानंतर सध्या लन्च ब्रेक झाला असून भारताकडून रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा बॅटिंग करत आहेत. भारताची परिस्थिती २४० वर ७ बाद आहे.
- आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या हनुमा विहारीने आपले अर्धशतक पूर्ण केले असून भारताची परिस्थिती ७६ ओव्हरनंतर २३७ वर ६ बाद आहे.
- ६४ ओव्हरनंतर भारताच्या २०० धावा पूर्ण झाल्या असून भारताची स्थिती सध्या २०४ वर ६ बाद आहे.
- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटीचा तिसरा दिवस पुन्हा सुरू झाला असून सध्या भारत बॅटिंग करत आहे. भारताची परिस्थिती १७७ वर ६ बाद असून हनुमा विहारी २६ तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत आहे.
- भारताने राहुलच्या रूपात दुसरी विकेट गमावली आहे. ३७ धावांवर करनने त्याला बाद केले.
- धवनला लवकर गमावल्यानंतर पुजारा आणि राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला.
- भारताचा सलामीवीर पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला आहे. त्याला ३ धावांवर ब्रॉडने बाद केले.
- इंग्लंडने पहिल्या डावात ३३२ इतकी मजल मारली. इंग्लंडकडून बटलरने सर्वाधिक ८९ धावा केल्या. तर भारताकडून जडेजाने घेतल्या ४ विकेट्स.
- दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोर ८ बाद ३०४, बटलर आणि ब्रॉड जोडीने ९० धावांची भागीदारी केली.
- दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच बुमराहने रशीदला माघारी पाठवले आहे.
- पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोर ७ बाद १९८ असून बटलर आणि रशीद नाबाद आहेत.
- इंग्लंडकडून मालिकेत अप्रतिम कामगिरी केलेला सॅम यावेळी शून्यावर बाद झाला असून, इशांतने त्याची विकेट घेतली आहे.
- इंग्लंडचा मोईन अली अर्धशतक करून बाद झाला आहे, इशांतच्या बॉलिंगवर पंतने त्याचा झेल घेतला आहे.
- रविंद्र जडेजाने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला बाद करत भारताला ५वे यश मिळवून दिले आहे.
- इंग्लंडचा विकेटकिपर जॉनी बेरस्टोवचा देखील बाद झाला असून इशांतच्या बॉलिंगवर पंतने त्याचा झेल घेतला आहे.
- इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही बूमराहने पायचीत बाद केले असून सध्या इंग्लंडची परिस्थिती १३४ वर ३ बाद आहे.
- इंग्लंडचा सलामीवीर अॅलेस्टर कूकला बुमराहमने बाद केले असून कूक ७१ धावांवर बाद झाला आहे.
- सध्या कूक आणि मोईन अली मैदानात आहेत
- सध्या सामन्यात टी-ब्रेक झाला असून ५९ ओव्हरनंतर इंग्लंड १२३ वर १ बाद अशी आहे.
- आपला अखेरचा सामना खेळत असलेल्या अॅलेस्टर कूकने आपले अर्धशतक पूर्ण केले असून ४७ ओव्हरनंतर इंग्लंडची परिस्थिती सध्या १०६ वर एक बाद आहे.
- लंच ब्रेक पर्यंत इंग्लंड १ बाद ६८ असून सध्या कूक आणि मोईन अली मैदानात आहेत.
- भारताच्या रविंद्र जडेजाने इंग्लंडचा सलामीवीर जेनिंग्जला बाद केले आहे. जडेजाच्या बॉलिंगवर के एल राहुलने झेल पकडला आहे.
- २० ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर ५६ वर एकही बाद नाही.
- इंग्लंडने नाणेफेक जिंकत, सामन्यात बॅटिंग घेतली आहे.
आजच्या सामन्याच भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल असून हार्दीक पांड्याच्या जागी विहारीला संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडचा सलामीवीर अॅलेस्टर कूकचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना असून त्याच्या चाहत्यांनी सामना पाहायला गर्दी केली आहे.