IND vs AUS : फलंदाजांची हाराकिरी; भारताच्या कसोटीतील ‘लोएस्ट’ धावसंख्येची नोंद

IND vs AUS : फलंदाजांची हाराकिरी; भारताच्या कसोटीतील ‘लोएस्ट’ धावसंख्येची नोंद

विराट कोहली

कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सत्र खूप महत्वाचे असते असे म्हटले जाते. हेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत दिसून आले. भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मात्र फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ९ अशी धावसंख्या असणाऱ्या भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. भारताची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी (लोएस्ट) धावसंख्या ठरली. याआधी १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा डाव ४२ धावांत संपुष्टात आला होता.

First Published on: December 19, 2020 11:36 AM
Exit mobile version