पालघरमध्ये मॉब लिंचिंगमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येनंतर देशातील संत समुदाय संतप्त झाला आहे. संत समुदायातील अनेक जण सतत हत्येच्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. दरम्यान मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी या हत्येप्रकरणी उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. उमा भारती यांनी ट्विट करून लिहिलं आहे की, संतांच्या हत्येत ठाकरे सरकार जळून राख होईल.
उमा भारती यांनी पालघरच्या मॉब लिंचिंग प्रकरणाबाबत सोमवारी सायंकाळी सलग पाच ट्विट केले आहेत. त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्रातील पालघरमध्ये संतांची निर्दयी हत्या झाली आहे. त्यामध्ये एक संत ७० वर्षांचे होते. ही घटना अत्यंत भयानक आणि वेदनादायी आहे. व्हिडिओमध्ये आरोपी स्पष्ट दिसत आहेत. पोलिस असून हे महापाप झालं आहे. जिथे उद्धव ठाकरे यांचं सरकार आहे.
1.पालघर, महाराष्ट्र में संतो की जो निर्मम हत्या हुई है जिसमें से एक संत तो 70 वर्ष के थे, भयानक रूप से दुखद एवं अंतरात्मा को झकझोर झकझोर देने वाली पीड़ा हुई है। 2. वीडियो में अपराधी साफ दिख रहे हैं पुलिस भी है फिर भी यह महापाप हो गया जहां पर कि उद्धव ठाकरे जी की सरकार है।
— Uma Bharti (@umasribharti) April 20, 2020
मी देशातील सर्व साधूंना त्या महान संतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि या महापातकचे प्रायश्चित्त म्हणून साधू संतांनी आहे त्या ठिकाणावरून उपवास करावा, असं उमा भारती यांनी संत समुदायाला आवाहन केलं आहे.
पाघलर मॉब लिंचिंग प्रकरणी सोमवारी जनतेला संबोधित करताना म्हणाले की, ठाकरे सरकार कोणत्याही दोषीला सोडणार नाही. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. काही लोकांना या विषयात आग पेटवण्यातचे काम करू नये. तसंच या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये.
हेही वाचा – CoronaVirus: या पेक्षाही वाईट वेळ जगावर येणार आहे, WHO ने दिला इशारा!