आम्ही लढू आणि जिंकू! हुकुमशाह घाबरल्याने…, राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेसचा एल्गार

आम्ही लढू आणि जिंकू! हुकुमशाह घाबरल्याने…, राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेसचा एल्गार

Twitter/Congress

Rahul Gandhi Punishment | नवी दिल्ली – मोदी आडनावावरून खिल्ली उडवल्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी राहुल गांधी यांना जामीन मिळाला आहे. परंतु, यावरून काँग्रेसने आता केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला आहे. हुकुमशाह घाबरल्याने ईडी, पोलीस, गुन्हे आणि शिक्षा देऊन भीती घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं काँग्रेसने अधिकृत ट्वीटर खात्यावर म्हटलं आहे.

हेही वाचा – मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा; जामीनही मंजूर

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केंद्र सरकावर निशाणा साधण्यात आला आहे. “सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधी हुकुमशाहांविरोधात आवाज उठवत आहेत. चुकीला चूक म्हणण्याचं धाडस करत आहेत. या धाडसामुळे हुकुमशाह घाबरला आहे. कधी ईडी, कधी पोलीस, कधी गुन्हे, कधी शिक्षा देऊन भीता घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधी याप्रकरणी न्यायसंगत अर्ज दाखल करतील. आम्ही लढू आणि जिंकू!” असा विश्वास या ट्वीटमधून व्यक्त करण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण?

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी हे कर्नाटकातील कोलारमध्ये म्हणाले होते की, “सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?” राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. तर गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


दरम्यान, यानंतर उच्च न्यायालयाने सुरत न्यायालयाला लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयात सुनावणीसाठी केलेला अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुरत न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या वकिलाने मोदी हे कोणताही विशिष्ट जातीचा समुदाय नसल्याचे म्हटले होते. राहुल गांधींचे सर्व आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच होते. अशावेळी त्यांनी मानहानीचा खटला दाखल करावा. यानंतर सुरत कोर्टातील मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांनी निकालासाठी २३ मार्च ही तारीख निश्चित केली होती. त्यानुसार आज सुनावणी करत राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – राहुल गांधींविरोधात निषेध ठराव आणण्यास विधानसभा अध्यक्षांचा नकार, कारण…

First Published on: March 23, 2023 1:48 PM
Exit mobile version