दुर्मीळ, चविष्ट आणि हेल्दी पावसाळी रानभाज्या

दुर्मीळ, चविष्ट आणि हेल्दी पावसाळी रानभाज्या

पावसाळा सुरु झाला की प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेत असतो. पावसाळयात आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नियामित व्यायाम आणि आहार या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. कारण त्याने फूड पॉयझनिंग होण्याची शकयता असते. त्यामुळे घरे बनविलेले पदार्थ खाणे हे रायोग्यसाठी उत्तम असते.

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

आपल्याकडे प्रत्येक ऋतूमध्ये विशेष पदार्थ खाल्ले जातात. त्याच प्रमाणे पावसाळा सुरु झाला की अनेक पावसाळी रानभाज्या(rainfed vegetables) बाजारात दिसू लागतात. त्या सर्वच भाज्या चविष्ट तर असतातच पण त्याचसोबत त्या रोग्यांसाठी सुद्धा उत्तम असतात. पावसाळ्यात जेवढं साधं आणि सात्विक पदार्थांचं सेवन केलं जाईल तेवढं ते आरोग्यासाठी उत्तम असते.

हे ही वाचा – World Chocolate Day 2022: जगात चॉकलेटचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? जाणून घ्या

पहिल्या पावसाच्या आगमनानंतर जुलै महिन्यात रानभाज्या यायला सुरुवात होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट पर्यंत या रानभाज्यांची रेलचेल(rainfed vegetables) बाजारात दिसते. अनेक खवय्यांसाठी पावसाळा हा ऋतू अनेक रानभाज्यांची पर्वणी घेऊन येतो. कटूले, बाना, चेरवाई, तरोटा, आरा या आणि यांसारख्या अनेक रानभाज्यांचा आस्वाद पावसाळ्यात घेता येतो. शहरी भागात कामाच्या गडबडीत तब्यतीची आणि आहाराची काळजी घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यांच्या साठी या पावसाळी रानभाज्या अतिशय उपयुक्त ठरतात.

हे ही वाचा – Speedy recovery foods | आजाराशी खेळताहात तर आहारात या गोष्टींचा समावेश करा

रानभाज्या बनविण्यासाठी सुद्धा सोप्या आहेत त्याचबरोबर त्या पोषक असतात. पावसाळी भाज्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. शरीराला योग्य असलेली जीवनसत्त्वे सुद्धा मिळतात आणि आरोग्य सुद्धा निरोगी राहते. त्यामुळे पावसाळ्यात या पौष्टिक रानभाज्यांचा आस्वाद नक्की घ्यावा.

हे ही वाचा – पावसाळ्यात मका खाणे आहे आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे

 

First Published on: July 7, 2022 4:39 PM
Exit mobile version