काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना वेध लागायचे ते गावी जाण्याचे. गावी जायचे नदीत, विहीरीत मनसोक्त डुंबायचे, रानवनात भटकायचे, रानमेवा खायचा, शेतावर जायचं , सरसर झाडावर चढायचं, जंगलात भटकंती करायची, ग्रामपंचायतीत जाऊन बसायचं मोठ्यांच्या गप्पा, निर्णय ऐकायचे. अशी एक ना अनेक धमाल मस्ती करताना सु्टटी केव्हा संपायची ते मुलांनाच कळायचं नाही. पण आता काळाप्रमाणे सगळंच बदललं असून सुट्टीतल्या गावांची जागा आता समर कॅम्पसने (उन्हाळी शिबिर) घेतली आहे. यामुळे परिक्षा संपल्या की पालक मुलांसाठी बेस्ट समस कॅम्पस शोधू लागतात. कारण या समर कॅम्पमध्ये मुलांना पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष ज्ञान मिळतं. जे त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठीही आवश्यक असते. आता तर शाळादेखील समर कॅम्प घेऊ लागल्या आहेत. यामुळे पालकांनी मुलांना या समर कॅम्पमध्ये पाठवणे आवश्यक आहे.
मुलांना समर कॅम्पमध्ये पाठवण्याची कारणे
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी आणि त्यांची सर्जनशीलता वाढवण्यासाठी अनेक शाळा उन्हाळी शिबिरांचे आयोजन करतात. ही उन्हाळी शिबिरे मुलांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळेच उन्हाळी शिबिरांचा कल हळूहळू वाढत आहे. सुट्टयाचा सदुपयोग मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी करायचा असेल तर त्यांना नक्कीच उन्हाळी शिबिरात पाठवावे.
मुलांना समर कॅम्पला पाठवण्याचे काय फायदे
अनुभव
ज्या गोष्टी वर्गात आणि घरात सांगता येत नाहीत त्या गोष्टी मुलांना समजावून देण्यात उन्हाळी शिबिर महत्त्वाची भूमिका बजावते. उन्हाळी शिबिरात घालवलेले काही दिवस तुमच्या मुलासाठी उत्तम अनुभव असू शकतात. नवीन ठिकाणी त्याच्या समवयस्कांसोबत नवीन गोष्टी शिकल्याने त्याच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो.
कौशल्यविकास
उन्हाळी शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसह त्यांची सामाजिक कौशल्ये सुधारण्याची संधी मिळते. या उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांची शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच त्यांच्या सामाजिक कौशल्यांमध्येही भर पडते. कोणाबरोबर कसे बोलावे, कसे बोलू नये यांसह दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी शिबिरांमध्ये मुलांना शिकायला मिळतात.
गुण
शिबिरात पोहणे, सायकल चालवणे, धावणे अशा नवनवीन गोष्टी केल्याने मुलांची शारीरिक तंदुरुस्ती सुधारते. याशिवाय उन्हाळी शिबिरांमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम असतात, ज्यामुळे मुलांमध्ये दडलेले कलागुण बाहेर येतात आणि त्यांना खूप काही शिकायला मिळते.
संवादकला
उन्हाळी शिबिरांमध्ये, मुले त्यांच्या मित्र आणि पालकांव्यतिरिक्त इतर अनेक लोकांशी संवाद साधतात, ज्यामुळे लोकांशी बोलण्याचा त्यांचा संकोच दूर होतो आणि त्यांचा आत्मविश्वास देखील सुधारतो. उन्हाळी शिबिरांमध्ये आयोजित केलेल्या इनडोअर आणि आउटडोअर गेम्समुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
मित्र
जीवनात नवीन मित्र बनवण्यासाठी उन्हाळी शिबिरे हे एक उत्तम ठिकाण आहे. अशा शिबिरांमध्ये तुम्ही तुमचे मित्र भेटता ज्यांना तुमच्यासारखीच आवड असते. अशा मित्रांच्या मदतीने मुलं खूप काही शिकू शकतात.
स्वावलंबी
जेव्हा मुले त्यांच्या पालकांपासून दूर जातात तेव्हा ते अधिक स्वावलंबी होतात. मुलांनी त्यांच्या विकासासाठी स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे.
Edited By – Aarya joshi