मिशन बिगीन अगेन..पुन:श्च हरिओम!
राज्यात लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेन अर्थात पुन:श्च हरिओम करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवा लॉकडाऊन आणि अनलॉक १, २, ३ कसा असेल, त्याविषयी माहिती दिली. (सविस्तर वाचा)
मनोरंजन होणार Unlock; राज्य सरकारची चित्रीकरणाला परवानगी!
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात चित्रपट, मालिका अशा कोणत्याही मनोरंजनात्मक गोष्टींचं चित्रीकरण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद झालं होतं. अनेक चित्रपटांचं अगदी काही दिवसांचं चित्रीकरण देखील अडकलं होतं. याशिवाय कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वात काम करणारे कलाकार किंवा पडद्यामागचे कर्मचारी अशा सगळ्यांनाच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. शनिवारी केंद्र सरकारने लॉकडाऊन ५.० आणि अनलॉक १.० जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारने राज्यातल्या सामान्य जनतेसाठी अनलॉक १, २ आणि ३ या फेजसाठी घोषणा केल्या. त्यानंतर आता मनोरंज विश्वासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळून चित्रीकरणाला आणि त्याच्याशी संबंधित इतर सर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)
कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच आपली नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ५ ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)
Maharashtra Government extends the #COVID19 lockdown till 30th June in the state. Movement of individuals to remain strictly prohibited between 9 pm to 5 am except for essential activities. pic.twitter.com/awz8mMXkDk
— ANI (@ANI) May 31, 2020
जूनपासून शाळा सुरू होणार नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत घेतल आहे. “दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि करोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावे” असा निर्णय घेण्यात आला आहे.
अनलॉक १.० निर्णयाचे स्वागत – रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया
केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केली असून कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. हा निर्णय जाहीर करताना ८ जूनपासून हॉटेल, धार्मिक स्थळे आणि मॉल्स उघडले जाणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अनलॉक १.० या निर्णयाचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने स्वागत केले आहे.
मास्कपासून मिळणार सुटका? युनिव्हर्सिटीचे नवे संशोधन
कोरोना विषाणुच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मास्क परिधान करणे हे आता बंधनकारक झाले आहे. मात्र आता मास्कपासून कायमची मुक्ती मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोविड १९ च्या युद्धात मास्क परिधान केल्यामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास उद्भवू लागण्याचे पाहायला मिळाले. यावर तोडगा म्हणून पंजाबच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने आता आगळ्यावेगळ्या पद्धतीचा मास्क बनवला आहे. त्यांनी मल्टिपर्पज एल्गीवर बेतलेला रेस्पिरेटर ऑक्सिजेनो बनवला असून याच्या वापरामुळे मास्कपासून सुटका मिळण्याचा दावा त्यांनी केला आहे. (सविस्तर वाचा)
आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना सुरु होणार
देशातील गरिबांना दिलासा देण्यासाठी उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून होईल. या योजने अंतर्गत रेशनकार्डचा लाभ देशात कुठुनही घेता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करताना याचा उल्लेख केला होता. केंद्र सरकारच्या या योजनेचा ६७ कोटी लोकांना फायदा होईल. (सविस्तर वाचा)
प्रवासापूर्वी रेल्वेचे हे नियम जाणून घ्या
भारतीय रेल्वे सोमवारी १ जूनपासून २०० नवीन गाड्या चालवणार आहे. या गाड्या सध्या कार्यरत असलेल्या १५ कामगार आणि एसी विशेष गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील. २१ मेपासून या गाड्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू झालं आहे. प्रवाशांना आता या गाड्यांसाठी १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांपूर्वी रिजर्वेशन करता येणार आहे. (सविस्तर वाचा)
पंतप्रधान मोदींची नाशिकच्या जाधवांना शाबासकी
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिक असलेले राजेंद्र जाधव संशोधक आहेत, त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे कोरोनाच्या लढ्यासाठी मोठी मदत झाली झाली आहे व होणार आहे, त्यामुळे या उल्लेखनीय निर्मिती कार्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात विशेष कौतुकोद्गार काढून संशोधकांचा गौरव केला आहे. (सविस्तर वाचा)
गेल्या २४ तासांत राज्यातील ९१ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या २४१६ इतकी झाली आहे. तर २६ पोलिसांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ९६९ पोलिसांनी करोनाचा पराभव केला आहे. १४२१ करोनाबाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. (सविस्तर वाचा)
In the last 24 hours, 91 police personnel have tested positive for #COVID19 have been reported. Total number of positive cases in Maharashtra Police rise to 2,416 with death toll at 26. 1421 cases are active: Maharashtra Police pic.twitter.com/czLHxqYIf0
— ANI (@ANI) May 31, 2020
पुण्यातील एपीएमसी बाजारपेठ आजपासून सुरू करण्यात आली आहे. तब्बल ५० दिवस बंद असलेली ही बाजारपेठ अखेर खुली करण्यात आली असून ११ हजार क्विंटल धान्यांच्या २०० गाड्या या एपीएमसीमध्ये आल्याचे येथील प्रशाकस बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
Maharashtra: APMC (Agricultural Produce Market Committee) market in Pune re-opened today. BJ Deshmukh, Administrator of the market says, "The market re-opened today after 50 days. 11,000 quintals of agricultural produce were brought to the market today, on 200 vehicles." pic.twitter.com/a2KcE5rwmf
— ANI (@ANI) May 31, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ३१ मे रोजी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांचे हे ६५ वे मन की बात कार्यक्रम आहे. (सविस्तर वाचा)
राज्य सरकारने शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सर्व कर्मचारी आणि भेटीसाठी येणाऱ्यांना थर्मल स्कॅनरद्वारे तपासले जाईल. तपासणी काटेकोरपणे केली जात आहे की नाही यावर लक्ष दिली जाईल. कार्यालयात काम करताना सर्व कर्मचा्यांना ३ स्तराचे मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.
All employees & visitors will be screened through thermal scanner before entering office. It will be checked if screening is being done strictly or not. All employee have to wear 3 ply mask or surgical mask while working in office: Maharashtra govt's guideline for its employees pic.twitter.com/6BTh8kvNJl
— ANI (@ANI) May 31, 2020
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार, १ जूनपासून हे नवे दर लागू होणार आहेत. (सविस्तर वाचा)
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ८२ हजार १४३ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ८ हजार ३८० कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ८९ हजार ९९५ अॅक्टीव्ह केसेस असून आतापर्यंत देशभरातील ८६ हजार ९८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर कोरोनामुळे ५ हजार १६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल दिवसभरात १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)
Highest spike of 8,380 new #COVID19 cases in the last 24 hours in India, 193 deaths reported. Total number of cases in the country now at 1,82,143 including 89995 active cases, 86984 cured/discharged/migrated and 5164 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/CfNY1DVBtC
— ANI (@ANI) May 31, 2020
तामिळनाडू सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला. सर्व जिल्ह्यांची ८ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच प्रवासासाठी ई पासची सक्ती नसल्याचे त्यांचे म्हटले आहे.
Lockdown will continue till June 30 in Tamil Nadu. All districts will be divided into 8 zones. E-pass not necessary for movement. Public transportation restricted in 7 zones of Kanchipuram, Chengalpattu and Thiruvallur district and 8 zones of Chennai: Tamil Nadu government
— ANI (@ANI) May 31, 2020
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानक येथे आपापल्या राज्यात जाण्यासाठी मोठ्या संख्यने कामगार, मजुरांनी गर्दी केली होती. प्रवासाला जाण्याकरता या परप्रांतियांनी रांगा लावल्या होत्या.
Maharashtra: Large number of migrant workers queued up outsideLokmanya Tilak Terminus in Mumbai yesterday to board 'Shramik Special' trains for their home states. pic.twitter.com/A7PaCP2Xv8
— ANI (@ANI) May 31, 2020
देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी आज ३१ मे २०२० ला संपत आहे. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११ वाजता मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कोरोनाविषयी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Do tune in tomorrow at 11 AM. #MannKiBaat pic.twitter.com/b71yh2NTox
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2020