‘लाथो के भूत बातों से नही मानते’; वाढीव वीज बिलावरुन मनसेचा सरकारला इशारा

‘लाथो के भूत बातों से नही मानते’; वाढीव वीज बिलावरुन मनसेचा सरकारला इशारा

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यूटर्न घेतल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान, वीज कंपन्या चुकीचे देयक देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल, असा सवाल करत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने नितीन राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळली. त्यामुळे वीजबिलात सवलत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे आता लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वीज बिलावरुन आता उर्जामंत्र्यांवर टीका करताना मनसेने ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. “वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळे झाले. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते,” असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.

 

First Published on: November 19, 2020 11:07 AM
Exit mobile version