देशाला एकदा कळू द्या ओबीसींची संख्या किती, शरद पवारांचे केंद्राला आव्हान

देशाला एकदा कळू द्या ओबीसींची संख्या किती, शरद पवारांचे केंद्राला आव्हान

मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा पार पडला. खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून (OBC reservation) केंद्रीय भाजप सरकारवर टीका केली. यावेळी ओबीसींची जनगणना करण्यात यावी. देशाला एकदा कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे, असे आव्हान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय भाजप सरकारला दिले.

हेही वाचा – ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

ओबीसी समाजाच्या लोकसंख्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज ओबीसी जनगणनेची मागणी होते आहे. एकदा देशाला कळू द्या की किती ओबीसींची सांख्या आहे. बिहारमधील मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या (OBC reservation) जनगणनेची मागणी केल्याचे यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगीतले. मात्र, केंद्रातील सरकार हे ओबीसींची जनगणना होऊ देणार नसल्याचेही ते म्हणाले. संघाचे भैय्याजी जोशी यांनी ओबीसी जनगणना मान्य नसल्याचे सांगितले होते. ओबीसी जनगणना झाल्यास त्याने देशात अस्वस्था निर्माण होईल असे त्यांनी म्हटले होते. ओबीसींच्या जनगणनेनुसार काही सत्य समोर येईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – ओबीसी आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातात असते तर मी… – जितेंद्र आव्हाड

आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण (OBC reservation) दिल्याशिवाय शांत राहणार नाही, ओबीसींच्या हक्कासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या नक्की करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू आहे. त्याला शरद पवार यांनी आपल्या भाषणात उत्तर दिले. भाजप नेते सांगतात महविकास आघडी सरकारने धोका दिला आहे. मग माझा सवाल आहे मागच्या पाच वर्षात तुम्ही झोपला होतात का? असा उलट प्रश्नही शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित केला.

First Published on: May 25, 2022 4:04 PM
Exit mobile version