आजकाल पहायला मिळते की, लोक प्लास्टिकच्या बॉटल मधून पाणी पिण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहितेय का, प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. प्लास्टिक कोणत्याही प्रकारचे असो. ते आरोग्य आणि निसर्गासाठी नुकसानदायक मानले जाते. काही लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिकची झाकण बंद बॉटल खरेदी करतात. त्याचसोबत तिच बॉटल घरी सुद्धा पाणी पिण्यासाठी वापरली जाते. मात्र यामुळे नक्की काय परिणाम होतात हे पाहूयात.
प्लास्टिक स्लो पॉइजन
प्लास्टिकमध्ये हानिकार रसायन नसते. पण त्यात पाणी ठेवल्यानंतर फ्लोराइड आर्सेनिक आणि एल्यूमिनिय सारखे पदार्थ तयार होतात. जे शरिरासाठी पॉइजन रुपात काम करू शकते. प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याचा अर्थ असा होतो की, स्लो पॉइजन. यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
कॅन्सरचा धोका
प्लास्टिकचा वापर केल्याने त्यात आढळणाऱ्या रसायनांचा थेट शरीराशी संपर्क येतो. प्लास्टिकमध्ये असणारे रसायन जसे सीसा, कॅडमियम आणि पारा शरिरात कॅन्सर, विकलांगता, इम्युन सिस्टिममध्ये बिघाड असे काही गंभीर रोग उद्भवू शकतात.
हाय शुगरची समस्या
आजकाल आपल्याला बहुतांशकरून पाणी हे प्लास्टिकच्या बॉटलमध्येच मिळते. निर्माता हे ग्राहकांनी ते खरेदी करावे म्हणून ते व्हिटॅमिन युक्त करतात. मात्र हे आणखी हानिकारक असते. कारण यामध्ये फूड शुगर आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप सारखे हानिकारक तत्त्व असतात.
रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम
प्लास्टिकच्या बॉटल मधील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. खरंतर यामधून निघणारे रसायने आपल्या शरीरात जातात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती बिघडली जाते.
हेही वाचा- ‘या’ फूड्सने तुम्ही होता एंग्जायटीचे शिकार