लग्न म्हणजे विश्वासाचे नाते. त्यामुळे आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र नवऱ्यावर कितीही विश्वास असेल तरीही महिलांनी काही गोष्टी त्याला सांगू नयेत. असे केल्याने तुम्ही त्याच्याशी खोटेपणाने वागत आहात असे होत नाही. परंतु महिलांनी काही गोष्टी आपल्या पर्यंतच ठेवणे फायद्याचे असते. (Relationship advice)
-माहेरच्या काही गोष्टी
लग्न झाल्यानंतर बहुतांश गोष्टी सासरी किंवा नवऱ्याला सांगितल्या जातात. आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांना स्विकारतो. अशातच जर तुम्ही माहेरच्या काही गोष्टी सासरी सांगितल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात ही वाद होऊ शकतात.
-बचत केलेले पैसे
बायकोने नेहमीच स्वत:ने किंवा नवऱ्याने कमावलेल्या पैशांची बचत केली पाहिजे. जेणेकरुन आपत्कालीन स्थितीत परिवाराची आर्थिक मदत होईल. अशातच बायकोने ही गोष्ट कधीच नवऱ्याला सांगू नये.
-दान केलेल्या पैशाबद्दल सांगू नका
वेदांमध्ये लिहिले आहे की, एका हाताने दिलेल्या दानाबद्दल दुसऱ्या हातापर्यंत कधीच कळू नये. तेव्हाच याचा लाभ होतो.
त्यामुळेच महिलांनी आपण एखाद्याला पैसे उसने किंवा दान केले असतील तर त्याबद्दल नवऱ्याला फारसे सांगू नका. त्याचसोबत यावरुन नवरा-बायकोमध्ये खर्चावरुन ही वाद होऊ शकतात.
हेही वाचा- लग्नानंतर मुलींमधेच नाही तर मुलांमध्येही होतात ‘हे’ बदल