अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- Advertisement -
- साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.
- भजी,पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजावताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे.
- शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
- भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला थोडा गोडेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
- पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
- शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्यामुळे साली लवकर सुटतात.
- खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
- पुदीना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात, पाणी-पुरीचे पाणी करताना उपयोगी पडतो.
- एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
- पावसाळयात मिठाला पाणी सुटते. भरणीवर कागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
हेही वाचा :