भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे मसाले केवळ आहाराचा स्वादच नाहीत तर आरोग्याला देखील अनेक फायदे देतात. मात्र आरोग्यासाठी फायदेशीर आहेत म्हणून निष्काळजीपणे त्यांचा आहारात समावेश करणं नुकसानकारक आहे. म्हणूनच हे पदार्थ वापरताना थोडी काळजी घ्यावी.
‘या’ पदार्थांचा अतीवापर टाळा
- बटाटा
खूप दिवस बटाटे घरात पडून राहिले असतील तर, हळूहळू त्याला कोंब येतात. अशा अंकुरित बटाट्याचा आहारात समावेश करणं धोकादायक आहे.
- फळांच्या बिया
सफरचंद, चेरी, नाश्पती, पीच या फळांच्या बियांमध्ये हायड्रोजन सायनाईडचं प्रमाण अधिक असतं.
याला प्रोसियिक अॅसिडही म्हणतात. त्याचा आरोग्याला त्रास होऊ शकतो.
- जायफळ
जायफळाची पावडर गोड पदार्थांची चव वाढवण्यापासून जुलाब थांबवण्यासाठी, झोप येण्यासाठी देखील वापरले जाते. आयुर्वेदामध्येही त्यांचं महत्त्व अधिक आहे. जायफळ अधिक प्रमाणात आहारात घेतल्यास हार्ट अटॅक, नसा कमजोर होणं, मन अस्वस्थ होणं अशा अनेक समस्या उद्भवतात.
- बदाम
अनेक दिवसांपासून स्वयंपाकघरात पडलेले बदाम किंवा कडवट झालेले बदाम आरोग्याला धोकादायक आहेत. बदामांमध्ये हायड्रोजन सायनाइडचं प्रमाण वाढल्यास ते कडवट होतात. अशा बदामांचा आहारात समावेश करणं आरोग्याला धोकादायक ठरु शकते.
हेही वाचा :