भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या सर्वात सामान्य भांड्यांपैकी एक म्हणजे लोखंडी कढई. असे मानले जाते की त्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.
हे एक पारंपारिक भांड देखील आहे जे विविध भारतीय पदार्थ शिजवण्यासाठी वापरले जाते, ज्यामध्ये मुख्यतः कोरड्या पदार्थ किंवा कोरड्या भाज्या असतात. परंतू लोखंडी भांड्यामधे अन्न शिजवल्यावर आरोग्याला हानी पोहचते. नेमकी काय हानी पोहचते हे पाहणे महत्वाचा ठरणार आहे.
- Advertisement -
आता आपण पाहूया असे कोणते पदार्थ आहेत जे लोखंडी कढईत शिजवले तर शरीराला हानी पोचू शकते-
- Advertisement -
- टोमॅटो-
टोमॅटो हा अम्लीय पदार्थ आहे. त्यामुळे ते लोखंडी कढईत शिजवल्यावर ते लोखंडी भांड्यात त्याची रासायनिक प्रक्रिया होते. तसेच टोमॅटोचे जी काही डिश बनवाल त्यात तो सगळा रस उतरतो आणि चव खराब होते. यानंतर हा पदार्थ खाताना लोहाची चव चाखायला मिळते.
- पालक-
पालक या भाजीमध्ये ऑक्सॅलिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते. आणि आपण जेव्हा लोखंडी पॅनमध्ये पालक शिजवतो. तेव्हा ते खराब होते आणि काळे पडते. हे ऑक्सॅलिक ऍसिडसह लोहाच्या प्रतिक्रियामुळे होते. यामुळे जेवणाची चवही बिघडू शकते. त्यामुळे पालक शिजवताना लोखंडी कढईचा वापर टाळावा.
- अंड-
बहुतेक लोक लोखंडी कढईत आमलेट बनवतात. पण ऑम्लेट कधीही लोखंडी कढईत बनवू नये. कारण कढईतील अंड हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यासोबतच ऑम्लेट किंवा इतर अंड्याचे पदार्थ बनवताना ते लोखंडी तव्याला किंवा कढईला चिकटलेले असल्याचे त्याचा जो काळपटपणा असतो तो सगळा अंड्याला लागतो आणि ते सगळं पोटात जाते. म्हणूनच ऑम्लेट बनवण्यासाठी नॉन-स्टिकचा पॅन वापरावा.
- मासे-
लोखंडी भांड्यात किंवा पातेल्यात मासे कधीही शिजवू नयेत. कारण मासे बनवताना आपण अनेक मसाल्याचे मिश्रण वापरतो आणि मास्यांचे मिश्रण सगळे लोखंडी कढईला चिटकते. आणि हे मिश्रण चिटकते म्हणून आपण तेलाचा वापर करतो पण हे तेल आरोग्याला हानीकारण आहे. तसेच लोखंडी कढईत मासे फ्राय केल्याने त्याची रासायनिक प्रक्रिया शरीराला हानी पोहचवते.
हेही वाचा :