सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे तणावाची समस्या फार वाढली गेली आहे. अशातच सध्याच्या प्रत्येक पिढीत एंग्जायटी, पॅनिक अटॅक अशा समस्या उद्भवतायत. अशातच तुमचा एखादा प्रियजन किंवा मित्र पॅनिक अटॅकच्या समस्येचा सामना करत असाल तर तुम्ही काय कराल याच बद्दल आम्ही सांगणार आहोत. तसेच कोणत्या गोष्टी करु नयेत याच बद्दल ही आपण पाहूयात. (Panic attack)
पॅनिक अटॅकची कारणं
पॅनिक अटॅक येण्यामागे ठोस असे कारण नाही. परंतु अचाकन ही स्थिती कधीही उद्भवू शकते. परंतु पॅनिक अटॅक येण्यामागील सर्वाधिक मोठे कारण भीती आणि एंग्जायटी असू शकते. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीला फार घाबरतो, तेव्हा त्याची हिच भीती वेगळे रुप घेते. तेव्हा पॅनिक अटॅक एखादी मोठी दुर्घटना किंवा आयुष्यात न विसरता येणाऱ्या दु:खामुळे सुद्धा होऊ शकते. स्थिती ठिक झाल्यानंतर पॅनिक अटॅक मधून सुद्धा व्यक्ती बाहेर येऊ शकते.
पॅनिक अटॅक आल्यानंतर काय करावे
-शांत रहा
-पॅनिक अटॅकच्या वेळी त्या स्थितीचा तुमच्यावर प्रभाव पाडू देऊ नका
-पॅनिक अटॅक आल्यानंतर पीडित व्यक्तीला शांत राहण्यास सांगा आणि त्याला सांगा असे काहीच झालेले नाही.
-बहुतांश पॅनिक अटॅक 20-30 मिनिटांत कमी होते.पण पीडित व्यक्तीला पॅनिक अटॅक पासून दूर राहण्यास मदत करावी.
-सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
-पीडितेला घाबरण्याचे कारण विचारा.(Panic attack)
पॅनिक अटॅकवेळी पीडित व्यक्तीला विचारा हे प्रश्न
-तुम्ही या स्थितीतून किती काळापासून जातायत?
-त्यांना विचारा नक्की काय झाले होते?
हेही वाचा-मनात सतत येतोय एकच विचार, मग व्हा सावध