आहार आणि वातावरणामुळे शरीरात अनेक केमिकल्स प्रवेश करतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहेत. लिव्हर आणि किडनी ही रसायने शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात पण याव्यतिरिक्त या चार पदार्थांचे सेवन केल्यानेदेखील विषारी रसायनांचा प्रभाव नाहीसा केला जाऊ शकतो.
‘हे’ पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने
- सलगम
अॅन्टीऑक्सीडेंट्स आणि सल्फरयुक्त सलगम डीटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करणार्या एंजाइम्सला सक्रिय करतं.
- काकडी
काकडीत आढळणारे 95 % पाणी लघवीच्या माध्यमाने विषारी रसायने आणि आम्लीय पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करतं.
- अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात. जे हृदयाला स्वस्थ ठेवत असून डिटॉक्सिफिकेशनचे काम करतं. मेंदूत 60 % फॅट असतात. म्हणून अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स मेंदूसाठी उत्तम आहार आहे.
- कोथिंबीर
कोथिंबीर विषारी तत्त्वांना शरीरातील पेशींपासून दूर ठेवते. यासोबत कोथिंबिरीचे सेवन केल्याने लिव्हरला स्वच्छ करणार्या एन्झाइम्समध्ये उर्जेचा प्रवाह सुरळीत होतो.
- गाजर
गाजर अ जीवनसत्त्व युक्त असल्याने हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भरपूर गाजर खाणार्यांना मोतीबिंदू आणि मंद दृष्टीची भीती नसते.
- टोमॅटो
टोमॅटोमध्ये मनुष्याच्या हृदयासारखे चार चेंबर असतात. यात असलेले विटामिन्स रक्त शुद्ध करून हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात.
- राजमा
राजमा इंग्रजीत किडनी बीन म्हणून ओळखले जाते. राजमाचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर आणि मधुमेहावर नियंत्रण राहतं. एकूण हे किडनीसाठी फायदेशीर आहे.