आजकाल अनेक जण पालकत्वाला खूप गांभीर्याने घेतात. मूल जन्माला येताच आणि 6 महिन्यांचे झाल्यावर त्याच्या खाण्यापासून शिक्षणापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेऊ लागतात. मग मुलं जशी मोठी होतात, त्यांना प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी शिकवा. त्यांनतर त्यांच्या शालेय जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे सुरू होते. पण तुम्हाला माहीत आहे का की, कधी कधी काहीही न करणे मुलांसाठी फायद्याचे ठरू शकते. ज्याला ‘लेझी पॅरेंटिंग’ अर्थात ‘आळशी पालकत्व’ असे म्हणतात. यासाठी आळशी पालकत्व म्हणजे नेमकं काय? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश येतो, हे आपण पाहुयात.
आळशी पालकत्व म्हणजे काय?
आळशी पालकत्वामध्ये, पालक हस्तक्षेप करत नाहीत किंवा मुलाला काहीही करण्यापासून रोखत नाहीत. उलट, त्यांना सर्व कामे स्वत: करू दिली जातात. यामुळे मुले चुका करतात आणि स्वतःच शिकतात. याने मुले स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम बनतात.
आळशी पालकत्वाचे फायदे –
- आळशी पालकत्वाचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना आत्मविश्वास मिळतो.
- मुलांच्या दैनंदिन कामात ढवळाढवळ न केल्याने आणि त्यांना स्वतःहून गोष्टी करण्याची परवानगी दिल्याने, त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
- आळशी पालकत्वामध्ये, पालक मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य देतात. फक्त मुलं कोणती मोठी चूक तर करणार नाही ना, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
- अनेक वेळा मुले कामे शिकताना चुकतात, स्वतःला हानी देखील पोहचवतात. मात्र याने मुले स्वावलंबी बनण्यास मदत मिळते.
- लेझी पॅरेंटिंगमुळे मुलांना पालकांच्या सूचना घेण्याचे आणि त्या फॉलो करण्याचे दडपण येत नाही.
हेही वाचा ; मुलांना शिक्षणाबरोबरच शिकवाव्यात ‘या’ 5 गोष्टी