स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासोबत काही साध्या-सोप्या टीप्स देखील गरजेच्या असतात. ज्या जेवन करताना खूप उपयोगी येतात. ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जेवण बनवताना वापरा ‘या’ टिप्स
- Advertisement -
- डाळिंबीची उसळ शिजत असतानाच जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबी अख्ख्या राहतात त्यांचे शिजून मेन होत नाही. तसेच डाळिंबी शिजण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाठरतात व चांगल्या लागत नाहीत.
- सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.
- साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताक शिंपडावे. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.
- वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो.
- Advertisement -
- पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून पेपरमध्ये गुंडाळून मग प्लास्टिकच्या डब्यात किंवा कॅरी बॅगेमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.
- भाजलेल्या दाण्याची साल काढू नये. सालासकटच कूट करावे. सालात एक प्रकारचे अॅन्टीऑक्सिडन्ट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात.
- वालाची (बिरडं/डाळिंब्या/पावटे) उसळ/भाजी करताना डाळिंब्या पूर्ण व नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ (हवा असल्यास) टाकावा अन्यथा त्या दाठरतात.
हेही वाचा :