उन्हाळ्याच्या दिवसात डिहाइड्रेशनच्या समस्येपासू दूर राहण्यासाठी आपण थंड पेये, ज्युस किंवा रसाळ फळं खातो. जेणेकरुन आपण हाइड्रेट राहू शकतो. उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स ऐवजी फळं खावीत असा सल्ला दिला जातो. अशातच शरीराला पाण्याची पुर्तता करण्यासाठी काकडी खाण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो.
खरंतर काकडीमध्ये पुरेश्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे तुम्ही डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहता येते. परंतु काकडी खाण्यासंदर्भाच लोकांच्या मात विविध प्रश्न उपस्थितीत राहतात. ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायले तर ते योग्य की अयोग्य? उपाशी पोटी आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? अशातच आम्ही तुम्हाला काकडी खाल्ल्यानंतर खरंच पाणी प्यावे का याच बद्दल सांगणार आहोत.
काकडी ही शरिरात पाण्याची पुर्तता करते. उन्हाळ्यात ती खाल्ल्याने याच प्रकारचे काही फायदे होतात. काकडीत पोटेशियम, कॉपर, विटामिन-सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि काही प्रकारचे पोषक तत्व असतात. यामध्ये 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. अशातच तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकतो. खरंतर काकडी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यानंतर त्यामधील पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
काकडी पचण्यास फार वेळ लागतो. त्यामुळेच काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटासंबंधित समस्या उद्भवू शकते. खरंतर उपाशी पोटी काकडी खाल्ल्याने फायदेशीर ठरते. यामुळे शरीर हाइड्रेटेड राहण्यासह टॉक्सिन्स बाहेर पडतात. या व्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचे सेवन करु शकका. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खुप कमी असते. जे फॅट्स कमी करण्यास मदत करते. यामध्ये फायबर पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे पोट खुप वेळ भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही अधिक खाणं खात नाहीत.