घरसंपादकीयदिन विशेषपक्षीतज्ज्ञ, वन अभ्यासक मारुती चितमपल्ली

पक्षीतज्ज्ञ, वन अभ्यासक मारुती चितमपल्ली

Subscribe

महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली.

मारुती चितमपल्ली हे भारतीय पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक आहेत. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी. एम. पोरे विद्यालयात प्राथमिक तर नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व तेथून ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना इंटरमीजिएट सायन्स पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईमतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. १९५८-६० या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वन विभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली.

त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले. निवृत्तीच्या वेळी (१९९०) ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक पदावर होते. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. पक्षीतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होऊन निबंधवाचन केले.

- Advertisement -

ते राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती आणि औरंगाबादच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सभासद होते. याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदाचे काम पाहिले. त्यांनी पक्षी ‘जाय दिगंतरा’, ‘जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचं धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’ (संस्कृत-मराठी अनुवाद), ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड’, ‘आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद), ‘पक्षीकोश’, ‘आनंददायी बगळे’, ‘निळावंती’, ‘केशराचा पाऊस’ इत्यादी पुस्तके आणि ‘चकवा चांदणं’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. चितमपल्ली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -