घरमहाराष्ट्रसंस्था उभ्या करायला अक्कल लागते; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला

संस्था उभ्या करायला अक्कल लागते; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला

Subscribe

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करताना अजित पवार यांनी मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले. संस्था उभ्या करायला अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. ते रत्नागिरीत प्रचारसभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचे आहे की, बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागते, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचे अजिबात कारण नाही. येथे कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, खासदार आमदार होणे सोपे; पण जिल्हा बँकेवर निवडून येणे अवघड आहे. कारण पार्टी तिथे कार्यकर्ता याप्रमाणे पक्षाचा कार्यकर्ता तिथे मजबुतीने काम करत असेल तर आमदारकी-खासदारकीत जमून जाते. येथे मात्र, वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका. आज आपल्या राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर याच बँका चांगल्या आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -