घरमहाराष्ट्रदापोडीतील दुर्घटनेत मातीचा ढिगारा कोसळून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

दापोडीतील दुर्घटनेत मातीचा ढिगारा कोसळून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोद कामादरम्यान कामगाराच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरू होते. त्यावेळी पुन्हा मातीचा ढिगारा कोसळला आणि यात अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव, निखिल गोगावले आणि सरोष फुंदे हे कर्मचारी अडकले गेले. निखिल आणि सरोष यांना सुखरूप बाहेर काढले असून विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विशाल जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कामगार नागेश अद्याप अडकलेला असून त्याच शोधकार्य एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि लष्कर पथक घेत आहे. दरम्यान, या घटनेमध्ये जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डीसीपी स्मिता पाटील यांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास बदली कामगार नागेश कल्याणी जमादार हा अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेले खडड्यात काम करत होता. तेव्हा त्याच्या अंगावर अचानक मातीचा ढिगारा कोसळला. त्याचा आवाज ऐकून शेजारीच असलेले ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे धावत आले. कामगार नागेश हा कंबर इतका मातीत अडकला होता. तेव्हा, दोघे ही त्यांना काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पुन्हा मातीचा ढिगारा कोसळला आणि तिघे अडकले. अग्निशमन दला ला माहिती देण्यात आली त्यांना पाचारण करण्यात आले. तातडीने शहीद विशाल जाधव, सरोष फुंदे, निखिल गोगावले हे घटनास्थळी दाखल झाले. सिडी च्या साहाय्याने ते खड्ड्यात उतरले मदतीसाठी गेलेले तरुण ईश्वर आणि सीताराम यांना सुखरूप बाहेर काढले. कामगार नागेश ला काढण्याचे शर्तीचे प्रयत्न तीन ही कर्मचारी करत होते. तेव्हा पुन्हा मातीचा ढिगारा नागेश, विशाल, निखिल आणि सरोष यांच्या अंगावर कोसळला. विशाल यांचे तोंड खाली आणि पाय वर झाले याच स्थितीत अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाचे दुसरे पथक, एनडीआरएफ, लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून कर्मचारी निखिल, सरोष आणि विशाल यांना खडड्याच्या बाहेर काढण्यात आले. मात्र, विशाल यांच्या औंध येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर निखिल आणि सरोष यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पाठीमागे एक दोन वर्षांची मुलगी आणि पत्नी आहे. त्यांचे वडील हणमंतराव जाधव हे पोलीस खात्यात होते ते निवृत्त झाले असून मुंबई येथे स्थायिक आहेत. जाधव कुटुंब हे मूळ सातारा येथील आहे. दरम्यान या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली असून या घटनेत ठेकेदाराला हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

८० तासांचे मुख्यमंत्री; सामनातून देवेंद्र फडणवीसांवर टिकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -