घरमहाराष्ट्रवृक्षांची तहान भागवणारे अवलीये

वृक्षांची तहान भागवणारे अवलीये

Subscribe

विक्रोळी ते मुलुंड महामार्गावरील ६०० झाडांना घालतात पाणी

लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात माणसांप्रमाणे प्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु माणसे आणि प्राण्यांप्रमाणे या लॉकडाऊनच फटका वृक्षांनाही बसला आहे. रस्त्याच्याकडेला असलेल्या लहान वृक्षांना पालिकेकडून रोज पाणी घालण्यात येते, परंतु सध्या अनेक पालिका कर्मचारी हे कोरोना ड्युटीमध्ये व्यस्त असल्याने या झाडांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झाडे सुकण्याची शक्याता आहे. विक्रोळी ते मुलुंडदारम्यान लावण्यात आलेली झाडे उन्हाळ्यात सुकू नयेत यासाठी मुकुंद महाबळेश्वरकर आणि अजित कंबोज यांनी वयाची पर्वा न करता महामार्गालगत लावलेल्या ६०० वृक्षांना रोज पाणी घालून जगवण्याचा जणू विडाच उचलला आहे.

मुंबईत दिवसेंदिवस वाढणारे कार्बन-डाय-ऑक्‍साईड वायूचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टिकोनातून ग्रीन अम्ब्रेला या निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेमार्फत विक्रोळी ते मुलुंड या महामार्गावर पिंपळाची ६०० वृक्ष लावण्यात आली होती. मार्च, एप्रिल, मे या महिन्यात वृक्षांना जादा पाणी द्यावे लागते. कारण उन्हाळ्यात झाड सुकण्याची शक्यता जास्त असते. लोकडाऊनच्या काळात झाडांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न संस्थेसमोर उभा राहिला राहिला होता. संस्थेचे अनेक सदस्य हे लांब राहतात. तेव्हा ६५ वर्षीय अजित कंबोज आणि ५५ वर्षीय मुकुंद महाबळेश्वरकर यांनी या झाडांची काळजी घेण्याचे आव्हान स्वीकारले.

- Advertisement -

मुकुंद महाबळेश्वरकर हे ठाण्याचे गृहस्थ असून विशेष कोर्टात सध्या ते कार्यरत आहे. सकाळी कार्यालयात निघताना आपल्या गाडीमध्ये वीस लिटरचे पाण्याचे पाच कॅन आणि पाण्याचे बॉटल सोबत घेऊन निघतात. ठाण्यातून नाहूरला पोहोचल्यावर त्यांचे काम सुरू होते. गाडीतून पाण्याचे कॅन काढत ज्या झाडांना पाण्याची गरज आहे अशांना हे पाणी देतात कार्याला जाताना नाहुर ते विक्रोळी या भागात असलेल्या वृक्षांना पाणी घालतात. कामावरून परत येताना विक्रोळी ते नाहुर या बाजूला असणाऱ्या झाडांना पाणी देतात. माझे काम खूप छोटे आहे, झाडांनाही जीव असतो. यामुळे मी हे कार्य करत आहे. मला निसर्गाची खूप आवड आहे.आजही अनेक ठिकाणी मी ट्रेकिंगसाठी जात असतो. यामुळे वृक्ष आणि माझा संबंध येत असतो. आमच्या संस्थेने लावलेली झाडं जगावं हे आमचे कर्तव्य आहे. लॉकडाऊन काळामध्ये त्यांना कसं सोडणार असे महाबळेश्वरकर यांनी सांगितले.


हेही वाचा – राणे सत्ता नसल्याने अस्वस्थ; बाळासाहेब थोरात यांचा राणेंना टोला

- Advertisement -

विक्रोळी येथे राहणारे ६५ वर्षे अजित कंबोज पहाटे साडेचारला उठून तयारी करतात. दोन पाण्याचे कॅन सायकलला बांधून घरातून निघतात. या मार्गावर असलेल्ल्या २०० पेक्षा जास्त झाडांना एक दिवस आड पाणी टाकतात. फक्त पाणी टाकून ते थांबत नाही, तर या त्या झाडांची छाटणी देखील ते करतात. मला लहानापासून निसर्गावर प्रेम आहे. ट्रेकिंगचा माध्यमातून मी अनेक किल्ले गड सर केले आहेत. यामुळे माझं आणि निसर्गाचं नात आणखी घट्ट झाले आहे. आम्ही लावलेली झाड अजून छोटी आहेत. मी जेव्हा झाडाची छाटणी करतो तेव्हा त्या झाडाची माफी मागतो.कारण त्याला ही जीव आहे. त्याला ही वेदना होत असतील, पण मी तुझ्या भल्यासाठी करतो आहे समजवत छाटणी करतो असे कंबोज यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -