घरमुंबईभुजबळ-आव्हाड यांच्या हत्येचा कट

भुजबळ-आव्हाड यांच्या हत्येचा कट

Subscribe

गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या जिवाला धोका असल्याच्या दिलेल्या इशार्‍यांनरतही आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्याचे उघड झाले आहे. भाजप सरकारच्या दबावामुळेच ही सुरक्षा कमी करण्यात आल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षा कमी करून सरकारने त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. नाशिक येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आव्हाड आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांच्या जीविताला धोका असल्याची बाब गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिली आहे. यामुळे त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे अपेक्षित होते. त्याऐवजी या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली ही बाब गंभीर असून निवडणूक तोंडावर असताना असा निर्णय धक्कादायक आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा कमी करुन सरकारने त्यांना मारण्याचा कट रचला आहे का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर छगन भुजबळ मोठे नेते आहेत. ते सरकारवर तुटून पडत असल्याने सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप मुंडेंनी केला. असले गलिच्छ राजकारण करुन नका, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

आव्हाडांना फेसबुकवरून धमकी
आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठार मारण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती. सोशल मीडियाचा वापर करून आव्हाड को खत्म कर दो, अशी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांकडून एमआयएमच्या एका कार्यकर्त्याला अटकदेखील करण्यात आली होती. सोशल मीडियावर जिवे मारण्याच्या धमकी संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -