महायुतीचा मागील पाच वर्षातील कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो, असे म्हणायची वेळ आलीय, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, संस्थात्मक विकासाचे नवे मॉडेल कर्जत-जामखेडमध्ये उभे करण्याची क्षमता रोहित यांच्यामध्ये आहे. शरद पवार साहेबांचा त्यांना आशीर्वाद आहे. साहेबांचा आणि मतदारांचा विश्वास रोहित नक्कीच सार्थ ठरवतील.
५ वर्षांतला यांचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो, असं म्हणायची वेळ आलीय. तरी ’मी पुन्हा येणार’ असे मुख्यमंत्री सांगतात. कशासाठी? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी, शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी,साखर-कांदा आयात करण्यासाठी पुन्हा यायचंय?