दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बर्ड फ्लू (बर्ड फ्लू व्हायरस) टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, तसेच खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे. (Bird Flu Do Not Drink Raw Milk Cook Non Vegetarian Food At Adequate Temperature Central Government Advice)
वाढत्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत केंद्र सरकारने लोकांना कच्च दूध न पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, शिजवलेले मांसाहार खाण्याचा सल्ला दिला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर केंद्राने दिलेल्या सल्ल्यानुसार, भारतातील केरळ, झारखंड आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही हा संसर्ग आढळून आला आहे. अशा परिस्थितीत लोकांना दूध व्यवस्थित उकळून सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे केल्याने विषाणूचा मानवांमध्ये संसर्ग रोखण्यास मदत होईल.
आत्तापर्यंतचे नमुने असे सूचित करतात की एव्हीयन इन्फ्लूएंझा मानवापर्यंत पोहोचण्यापासून रोखता येऊ शकतो. अमेरिकेतील सुमारे आठ राज्यांतील म्हैशीच्या दुधात बर्ड फ्लू या विषाणूची पुष्टी झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य महासंचालक डॉ. अतुल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी इन्फ्लूएंझा संदर्भात आढावा घेण्यात आला. त्यामध्ये प्रभावित राज्यांव्यतिरिक्त ICMR चे उच्च अधिकारी आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते.
H5N1 आणि H1N1 या दोन्ही प्रकारच्या इन्फ्लूएंझावर बैठकीत चर्चा झाली. हे दोन्ही विषाणू एका कुटुंबाचा भाग आहेत आणि केरळमधील तीन जिल्ह्यांतील बदकांमध्ये H1N1 संसर्गाची पुष्टी झाली आहे. बैठकीत अधिकाऱ्यांनी सल्ला दिला आहे की, ज्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे आढळत आहेत, त्या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ओपीडीचे निरीक्षण आणि रुग्णांना दाखल करण्याचे प्रमाण वाढवण्यात यावे. इन्फ्लूएंझा (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) च्या प्रकरणांची रुग्णालयांमध्ये नोंद करावी आणि माहिती राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) कडे पाठवली जावी. तसेच, प्रत्येक संशयित किंवा संक्रमित रुग्णाच्या नमुन्याचे जीनोम अनुक्रम अनिवार्य आहे, ज्यासाठी ICMR च्या देशभरात प्रयोगशाळा आहेत.
Edited By – Vaibhav Patil