घरदेश-विदेश"पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा देश"!

“पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा देश”!

Subscribe

पाकिस्तानाने हे धोरण थांबवावे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे.

पाकिस्तान या देशामध्येच दहशतवादी घडवले जातात. पाकिस्तान हा दहशतवाद्यांची फॅक्ट्रीच आहे, असे वक्तव्य भारताचे पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. केवळ भारतानेच नाही तर, अमेरीकेच्या परराष्ट्र मंत्री यांनीही पाकिस्तानावर कठोर शब्दात निशाला साधला आहे. पाकिस्तानाने भारतात दहशतवादी कारवाया करणे थांबवावे. तसेच पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील घुसखोरी कायमची बंद करावी, असेही त्यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांची फॅक्ट्री आहे, असे म्हटले आहे. यामुळे भारताने पाकिस्तानाशी होणारे व्यवहार थांबवले आहेत. दिल्लीतून व्हिडिओ लिंकच्या आधारे बकिंगमशायरमध्ये यूके-इंडिया वीक या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. या दरम्यान त्याच कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जगभरात सर्वात जास्त दहशतवादी पाकिस्तानात आढळतात. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात ठिकठिकाणी दहशतवादी स्थळे उभारलेली आहेत. याचे मुख्यकारण म्हणजे पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. दहशतवाद हे भारताविरोधात वापरण्याचे शस्त्र आहे, अशी पाकिस्तानाची मानसिकता आहे. या हेतूने पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना खतपाणी घालते आहे. मात्र भारत देश हे कधीही सहन करणार नाही. पाकिस्तानाच्या धोकाबाजीचे भारताकडून नेहमी प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

अमेरिकेकडून पाकिस्तानविरोधात काही कठोर पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती माइक पोम्पिओ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली. पाकिस्तानने लवकरात लवकर भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखाव्यात असा अमेरिका प्रयत्न करत आहे. यासाठी अमेरिकेने योजना आखली आहे. तसेच पाकिस्तान अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना मदत करत आहेत. या देशाने हे धोरणही थांबवावे असेही पोम्पिओ यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -