भारत आणि चीनमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर भारत आणि चीनमधील वाद आणखीनच विकोपाला गेला. दरम्यान, विरोधकांनीही या प्रकरणी मोदी सरकारवर सडकून टिका केली असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खणाखाती आरोप केले आहेत. आज राहुल गांधी यांनी ट्विट करून दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आपले जवान का मारले गेले तसेच त्यांना कोणत्या जागेवर मारण्यात आले. हे दोन प्रश्न उपस्थित करतानाच त्यांनी मोदी सरकारने चीनसमोर शरणागती पत्करली आहे, असेही ट्विटमध्ये नमूद केले आहे.
PM has surrendered Indian territory to Chinese aggression.
If the land was Chinese:
1. Why were our soldiers killed?
2. Where were they killed? pic.twitter.com/vZFVqtu3fD— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 20, 2020
हेही वाचा –
WHO चा इशारा: ‘कोविड-19 चा प्रसार वेगाने होतोय, जग धोकादायक टप्प्यावर’