घरदेश-विदेशटिक टॉक आणि हेलो अॅपवर सरकारची बंदी?

टिक टॉक आणि हेलो अॅपवर सरकारची बंदी?

Subscribe

टिक टॉक आणि हेलो अॅपवर केंद्र सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे. कारण, या अॅपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रार आल्याने केंद्र सरकारने या अॅपच्या अधिकाऱ्यांना २४ प्रश्नांची नोटीस पाठवली आहे.

सध्या तरुणाईला टिक टॉक अॅपने भुरळ घातली आहे. या अॅपमार्फत तरुण मुलंमुली एखाद्या गाण्यावर किंवा डायलॉगवर व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. अल्पावधीतच टिक टॉक अॅप लोकप्रिय झाले आहे. तर हेलो अॅप देखील मोठ्या प्रमाणात सध्या वापरले जात आहे. परंतु, आता टिक टॉक आणि हेलो अॅपवर केंद्र सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे. कारण, या अॅपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रार आल्याने केंद्र सरकारने या अॅपच्या अधिकाऱ्यांना २४ प्रश्नांची नोटीस पाठवली आहे. जर या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाही तर या अॅप्सच्या वापरावर भारतात बंदी येऊ शकते.


हेही वाचा – मद्रास उच्च न्यायालयाने ‘टिक टॉक’वरील बंदी उठवली

- Advertisement -

पंतप्रधानांकडे बंदची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचया संघटनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे टिक टॉक आणि हेलो या चीनी मोबाईल अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच ही अॅप्स देशविरोधी कामांचा अड्डा बनल्याचा आरोप या संघटनेने केला होता. या आरोपाची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून या अॅप्सच्या अधिकाऱ्यांना इलेट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. यावर टिक टॉकचे म्हणणे आहे की, पुढील तीन वर्षात स्थानिक पातळीवर जबाबदारीसाठी तंत्रज्ञानासंबंधी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कंपनी १०० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

भारतातील वरिष्ठ नेत्यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर

हेलो अॅपबाबत ‘स्वदेशी जागरण मंच’ने निवडणूक आयोगालाही पत्र लिहिले आहे. या पत्रात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, हेलो अॅपद्वारे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ११ हजारांहून अधिक राजकीय जाहिरातींसाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या जाहिरातींमध्ये भारतातील वरिष्ठ नेत्यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या निवडणुकीच्यावेळी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्याचबरोबर, हे अॅप चीन सरकारचे असल्यामुळे हस्तक्षेपाद्वारे भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत येऊन पोहोचले आहे. याचा उपयोग भारतात सामाजीक अराजकता माजवण्यासाठी होऊ शकतो, असेही ‘स्वदेशी जागरण मंच’ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या अॅपवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘टिक टॉक’ बंदीमुळे युजर्स नाराज; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -