घरसंपादकीयदिन विशेषप्राच्यविद्या संशोधक, कायदे पंडित काशिनाथ तेलंग

प्राच्यविद्या संशोधक, कायदे पंडित काशिनाथ तेलंग

Subscribe

काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे प्राच्यविद्या संशोधक, कायदे पंडित, सुधारक आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १८५० रोजी मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बापूभाई. त्र्यंबकराव या त्यांच्या थोरल्या चुलत्यांना मूल नसल्यामुळे त्यांनी काशिनाथ यांना दत्तक घेतले.

काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे प्राच्यविद्या संशोधक, कायदे पंडित, सुधारक आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १८५० रोजी मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बापूभाई. त्र्यंबकराव या त्यांच्या थोरल्या चुलत्यांना मूल नसल्यामुळे त्यांनी काशिनाथ यांना दत्तक घेतले. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते मॅट्रिक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे ते पहिले विद्यार्थी होत. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी एल्फीन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१८६८ मध्ये बी. ए., १८६९ च्या शेवटी ते एम. ए. झाले. एम. ए. करतानाच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. ते वयाच्या १९ व्या वर्षी एम ए. एलएल. बी. झाले. नेहमीच प्रथम क्रमांक राहिल्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्त्या व बक्षिसे मिळाली. नंतर त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. पुढे १८८९ मध्ये उच्च न्यायालयात त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. हिंदू कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. संमतीवयाच्या कायद्यास त्यांची मान्यता होती. १८९२ मध्ये त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.

- Advertisement -

कायद्याप्रमाणेच इतिहास, राज्यशास्त्र, भाषासाहित्य या विषयांचा त्यांचा व्यासंग मोठा होता. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते, तर फ्रेंच, जर्मन या भाषाही त्यांना अवगत होत्या. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, इत्यादी सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. मराठी भाषा व मराठी वाङ्मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता. त्यांचे बहुतेक ग्रंथ अनुवादित स्वरूपाचे आहेत. ‘भर्तृहरीची नीती’ , ‘वैराग्य शतके’ व ‘मुद्राराक्षस’ नाटक हे त्यांचे संपादित ग्रंथ आहेत. अशा या महान कायदे पंडिताचे १ सप्टेंबर १८९३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -