घरसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ कवी, कादंबरीकार भगवतीचरण वर्मा

श्रेष्ठ कवी, कादंबरीकार भगवतीचरण वर्मा

Subscribe

भगवतीचरण वर्मा यांचा आज स्मृतिदिन. भगवतीचरण वर्मा हे आधुनिक हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी होते. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९०३ रोजी उत्तर प्रदेशातील शफीपूर येथे झाला. जगमोहन विकसित यांच्या प्रेरणेने भगवतीचरण यांनी मैथिलीशरणांचे भारतभारती काव्य अभ्यासले व त्या प्रभावातून सातव्या इयत्तेत असल्यापासूनच ते स्वतः कविताही रचू लागले. बी. ए. (१९२६), एल. एल.बी. (१९२८) झाल्यावर १९३५ पर्यंत त्यांनी वकिली केली.

काही काळ ते भदरी संस्थानाधिपतींच्या दरबारी होते. पुढे त्यांनी कोलकात्यात विचार साप्ताहिकाचे संपादक म्हणून (१९४०-४२) तसेच मुंबईत चित्रपटसृष्टीत पटकथाकार म्हणून (१९४२-४७) काम केले. १९४८ ते १९५७ पर्यंत ते लखनौ येथील नवजीवन या दैनिकाचे संपादक होते. १९५० पासून त्यांची आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर हिंदी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.

- Advertisement -

त्यांच्या साहित्यसेवेचा प्रारंभ कवितांनी झाला. ‘मधुकण’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘प्रेम-संगीत’ (१९३७) व ‘मानव’ (१९४०) हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले. ‘पतन’ ही त्यांची पहिली कादंबरी (१९२८). त्यानंतरची ‘चित्रलेखा’ (१९३३) ही त्यांची कादंबरी अत्यंत गाजली. ‘तीन वर्षं’ (१९३६) ही सामाजिक कादंबरी म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीने दिपून गेलेल्या तरुणाच्या व्यथेची कथा आहे. टेढे-मेढे रास्ते (१९४७)

‘भूले-बिसरे चित्र’ (१९५९), ‘अपने खिलौने’ (१९५७), ‘बुझता दीपक’ (१९५०) हा एकांकिका-संग्रह ‘रुपया तुम्हे खा गया’ (१९५५), ‘इन्स्टॉलमेंट’ (१९३६), ‘दो बाँक’े (१९४१), ‘राख और चिनगारी’ (१९५३), ‘मोर्चाबंदी’ (१९७६) ही पुस्तके त्यांनी लिहिली. अशा या श्रेष्ठ लेखकाचे ५ ऑक्टोबर १९८१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -