सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती इशा अंबानीच्या लग्नाची… या लग्नाचा शाही थाट पाहता या लग्नातील प्रत्येक गोष्टींवर अगदी बारकाईने सगळ्यांचे लक्ष होते. या लग्नातील प्रत्येक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला. यातीलच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे द ग्रेट अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, आमीर खान पाहुण्यांना जेवण वाढतानाचा.. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबानींच्या लग्नात या सेलिब्रिटींवर पाहुण्यांना जेवण वाढण्याची वेळ का आली? याच्या उलट सुलट चर्चा रंगू लागल्या. त्यावर अनेक विनोद देखील व्हायरल होऊ लागले. पण आता अभिषेकने लग्नात जेवण का वाढले याचे उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
Big b and Aamir Khan serving food at Isha Ambani wedding #amitabhbachchan
पाहा- Isha Ambani Wedding : शाही लग्नसोहळ्याला स्टार्सची हजेरी
काय म्हणाला अभिषेक ?
एका ट्विटला उत्तर देताना अभिषेक म्हणाला की, याला ‘साजन गोठ’ असे म्हणतात. या परंपरेनुसार नवऱ्याकडील पाहुण्यांना माहेरच्या लोकांनी आदरातिथ्य करत जेवण वाढायचे असते. अभिषेकने दिलेल्या उत्तरानंतर साजन गोठ हा प्रकार गुजराती लग्नामध्ये असतो. नवऱ्याकडील मंडळीचे आदरतिथ्य या प्रथेतून केले जाते. आता अंबानी कुटुंबियांच्याजवळ बच्चन आणि खान कुटुंबीय आहे हे काही वेगळे सांगायला नको म्हणूनचा इशाच्या लग्नात त्यांना हा मान मिळाला.
Why were Amir Khan and Amitabh Bachchan serving food in Ambani wedding?
— Prerna (@Iam_Prerna) December 15, 2018
It is a tradition called “sajjan ghot”. The brides family feeds the grooms family.
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) December 16, 2018
१२ डिसेंबर रोजी झाला शाही थाट
इशा आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा अंबांनीच्या अँटालियाया बंगल्यामध्ये झाला. या लग्नासाठी देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक कलाकार मंडळी आली होती. या लग्नाची चर्चा लग्न ठरल्यापासून होती. नुकतीच लग्नबंधनात अडकलेली ही जोडी वरळी येथे राहणार आहे. या लग्नातले अनेक व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत.