घरमहाराष्ट्रपहिली ते आठवीची परीक्षा रद्द

पहिली ते आठवीची परीक्षा रद्द

Subscribe

विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून निकाल

राज्यावर सध्या करोनाचे संकट असून, दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी आता शिक्षण विभागाने देखील पाऊल टाकले असून, राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. शालेय शिक्षाण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

या संदर्भात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दरम्यान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. दरम्यान पहिली ते आठवीपर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून, वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

१५ एप्रिलनंतर ९ वी आणि ११ वीची परीक्षा
दरम्यान १ ते ८ वी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी इयत्ता 9 वी आणि 11 वी ची उर्वरित परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. दरम्यान दहावीचे जे दोन पेपर येत्या शनिवारी आणि सोमवारी आहेत ते पेपर वेळापत्रकाप्रमाणे होतील. तसेच दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे, असे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले. एवढेच नाही तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. या कालावधीत शासनातर्फे देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -