घरदेश-विदेशरविवारी २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

रविवारी २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

Subscribe

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सुमारे २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या एक दिवसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणार्‍या लोकलच्याही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पॅसेंजर ट्रेन 21 मार्चला रात्री 11 वाजल्यापासून 22 मार्च पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी 22 मार्चला पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहतील. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकल रेल्वेबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार विभागीय रेल्वे खात्याला दिले आहेत. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या दिवशी किती लोकल रेल्वे सोडायच्या यावर अंतिम निर्णय विभागीय रेल्वे विभागच घेणार आहे.

- Advertisement -

मुंबई लोकल रेल्वे प्रशासनाकडे जनता कर्फ्यूच्या दिवशीच्या नियोजनाची विचारणा केली असता त्यांनी रविवारी तशा 80 टक्के गाड्या बंद असल्याचे सांगितलं. तसेच आणखी रेल्वे गाड्या रद्द करण्याची आवश्यकता असल्यास त्यावरही लवकरच निर्णय घेऊ, असेही सांगण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे,असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध आणण्याची मागणी होत आहे. त्यावर सरकारने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, रविवारी (20 मार्च) जनता कर्फ्यूच्या दिवशी किमान वाहतूक बंद ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचे या निर्णयातून दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -