घरमहाराष्ट्रनाशिकचे पाणी जायकवाडीला दिल्यास पालकमंत्र्यांना शहरात प्रवेश नाही

नाशिकचे पाणी जायकवाडीला दिल्यास पालकमंत्र्यांना शहरात प्रवेश नाही

Subscribe

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

नाशिकचा दुष्ताळ परिस्थितीचा अभ्यास करुन जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची गरज काय?

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असताना सुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची गरज काय ? असा प्रश्न नाशिककरांना पडलेला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांना खुश करण्यासाठी शासनाने अभ्यास न करता हा निर्णय घेतलेला आहे. त्याची किंमत तहानलेल्या दत्तक नाशिककरांना चुकवावी लागणार असल्याचे या निवदेनात म्हटले आहे.

- Advertisement -

गिरीष महाजनांना नाशिकमध्ये बंदी करु

शासनाने नाशिकच्या दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थितीचा अभ्यास करावा आणि त्यानुसार जनहितार्थ पुढील निर्णय घ्यावा. नाशिककरांवर अन्याय होणारा निर्णय जलसंपदा विभागाने घेवून जायकवाडी धरणास पाणी सोडले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -