शनिवारी सकाळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या साथीने सरकार स्थापन केले. मुंबईत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काही दिवसांपुर्वी केलेली भविष्यवाणी केली होती, ती अखेर खरी ठरली.
Union Minister & BJP leader, Nitin Gadkari on #MaharashtraGovtFormation: I had earlier said anything can happen in cricket and politics, now you can understand what I meant. pic.twitter.com/Lv9Gc65tKQ
— ANI (@ANI) November 23, 2019
ज्यावेळी राजकीय क्षेत्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नव्हता त्यावेळी नितीन गडकरींनी एक मोठे वक्तव्य केले होते. ‘क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य आहे. कारण ज्यावेळी आपल्याला वाटते आपण मॅच हारणार आहोत, त्यावेळी नेमके उलट होऊन संपुर्ण गेम बदलू शकतो.’, असे गडकरींनी सांगितले होते.
तसेच, गडकरींनी असे देखील सांगितले की, ‘महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाची मला संपुर्ण माहिती नाही. मात्र राजकारणात काहीही शक्य होऊ शकते.’