मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरे यांनी वणी तालुक्यात लोकांची भेट घेतली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मोदी सरकारवर कसून टीका केली. किती काळ मूर्ख बनणार आहात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काय म्हणाले राज ठाकरे ?
- निवडणुकीच्या तोंडावर खोटं बोलणाऱ्या लोकांना दूर करा
- आज काय निवडणुका नाहीत मी इथे काय मत मागायलाही आलो नाही
- तुमच्या अपेक्षा कोणाला कळतात याच भान ठेवा
- शिवसेना नेत्यांच्या खिशात राजेनामे असतात मात्र शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही
- निवडणुकीत योग्य तो निर्णय घ्या नाहीतर पाच वर्षे बोंबा माराल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षबांधणीसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून अमरावती एक्सप्रेसने ते अमरावतीला रवाना झाले होते. पश्चिम विदर्भ दौऱ्यादरम्यान ते पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.