पुणे शहरातील मनसेच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनी बुधवारी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. मनसेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा सुरु होत्या. रुपाली पाटील यांचं अखेर कोणत्य पक्षात जायचं हे ठरलं आहे. गुरूवारी त्या मनगटी घड्याळ बांधणार आहेत.
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …@NCPspeaks @ShivSena@INCIndia
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 16, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पाटील यांचा उद्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. रुपाली पाटील यांच्या पक्षप्रवेशाने पुण्यात राष्ट्रवादी अधिक मजबूत होईल. पुण्यात एक फायरब्रँड महिला नेत्याची राष्ट्रवादी गरज होती. रुपाली पाटील यांच्या पक्षात येण्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल.
पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास
मनसेचा नेमका कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिलायावर बोलताना रुपाली पाटील यांनी पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत, असं भावनिक पत्र रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिलं आहे.