घरमहाराष्ट्रखूशखबर! आजपासून एसटी धावणार ई-पास शिवाय प्रवास करता येणार

खूशखबर! आजपासून एसटी धावणार ई-पास शिवाय प्रवास करता येणार

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद करण्यात आली होती. बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता 113 दिवसांनंतर गुरुवारपासून सोशल डिस्टन्सिंगचे नियमानुसार राज्यभरात एसटीच्या बसेस धावणार आहेत. तसेच एसटीतून प्रवासाला ई-पासची गरज लागणार नाही.

कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून एसटीचे चाक राज्यभरात बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मध्यंतरी एसटीचा आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी देण्यात आली होती. मात्र अनेक जिल्ह्यातून एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासाबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलेला होता.

- Advertisement -

आता बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. गुरुवारपासून सुरू होणार्‍या एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्प्याटप्प्याने सुरू होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

दीड लाख प्रवाशांना दिली एसटीने सेवा

- Advertisement -

लॉकडाऊन काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर-सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. लॉकडाऊन काळात मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून अत्यावश्यक सेवेतील एसटी कर्मचार्‍यांसाठी दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेर्‍यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवाशी सेवा एसटीने पुरविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -