घरमुंबईआषाढीच्या निमित्ताने 'अवयवदानाचे' धडे

आषाढीच्या निमित्ताने ‘अवयवदानाचे’ धडे

Subscribe

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह आज मुंबईही विठूरायाच्या गजराने न्हाऊन निघाली. सोमवारी मुंबईतूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून वडाळ्याच्या प्रति पंढरपूरमध्ये दिंडी दाखल झाल्या. यादरम्यान लालबाग परिसरातील टाळ – मृदूंगाच्या गजरात अवयवदानाच्या जनजागृतीसाठीही एक विशेष दिंडी काढण्यात आली. समाजात अवयवदानाचं महत्त्व निर्माण व्हावं आणि त्यातून अवयवदानाचा प्रसार व्हावा यासाठी ही दिंडी काढण्यात आली होती. अॅपेक्स किडनी फांऊडेशनतर्फे ही दिंडी काढण्यात आली. समाजात आजही अवयवदानाबाबत हवीतशी आणि हवी तितकी जागृती नाही. त्यामुळे अवयवदान किती महत्त्वाचं आहे? हे समजावण्यासाठी या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.

”अवयवदानासंदर्भात अजूनही लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत की, अवयवदान केल्याने माणूस नर्कात जातो. मात्र असं नसून अवयवदान केल्याने किमान ८ जणांचे प्राण वाचवता येतात. हे लोकांना समजावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.”  – डॉ. वैशाली बिच्चू (संचालक), अॅपेक्स किडनी फाउंडेशन

- Advertisement -

या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी अवयवदानाच्या माहितीचे बोर्ड घेऊन जागृती करण्याचा प्रयत्न केला. या फलकांवर ‘अवयवदान हेची दान करावे आता’ तसंच ‘वैकुंठी मिळेल स्थान, केल्यास अवयवदान’ अशी ब्रीदवाक्य लिहिण्यात आली होती. अॅपेक्स किडनी फाऊंडेशनचे कार्यकर्ते निलेश शेडगे यांनी सांगितलं कि, ”अवयव मिळत नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. आणि या दिंडीच्या माध्यामाततून आम्ही लोकांना हेच सांगू इच्छितो की अवयवदान करा आणि लोकांचा जीव वाचवा.” देशात अवयवदान फार कमी प्रमाणात होतं. १० लाख लोकांच्या मागे केवळ ०.५८ टक्के लोक अवयवदान करतात. अवयव न मिळाल्याने दरवर्षी अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -