वसईचे मतदार आमदार हितेंद्र ठाकूर हे वर्षानुवर्षं असलेले समीकरण आजवर तुटू शकले नाही. ही नाळ इतकी घट्ट आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याचा विश्वास येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. वसईच्या जनतेने प्रत्येक वेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात भरभरून माप टाकले. मीसुद्धा कामे करून त्याची उतराई केल्याचे ठाकूर म्हणाले. आज वसई शहर नावारूपाला आले त्यात ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे.
लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम व आमदार ठाकूर यांच्यामध्ये असलेली असलेली कर्तव्य भावना याचा सुरेख संगम या वसई मतदारसंघात पाहायला मिळतो. मुलांसाठी उद्याने, क्रीडांगणे, युवकांसाठी तरण तलाव, ज्येष्ठ नागरिकासाठी बैठक निवारा, रुंद रस्ते, परिवहन सेवा, विद्यार्थ्यासाठी मोफत बससेवा, अद्ययावत मार्केट इत्यादी विकासकामे मार्गी लावण्यात ते यशस्वी ठरले. वाढत्या लोकसंख्येच्या या शहरांना सरकारकडून विकासकामासाठी भरीव आर्थिक निधी मिळावा, अशी अपेक्षा असते. ठाकूर यांनी आजवर केलेली विकासकामे कधीही खोळंबून राहिली नाहीत.
सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी कष्टकरी, छोटे व्यवसायिक, महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिक हे सतत आमदार ठाकूर यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र आहे. राज्यात विक्रमी मतदान घेऊन विजयी होणारा उमेदवार म्हणून त्यांची इतिहासात नोंद होणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या 13 दिवसांत त्यानी संपूर्ण मतदारसंघ दोन वेळेस पिंजून काढला आहे. यावेळी त्यांना मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सतत लोकांमध्ये राहून त्यांची केलेली कामे याची ही फलश्रुती आहे. असे मी समजतो, असे आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले.