घरमुंबईराज्याला कुठलाही इशारा नाही, घाबरून जाण्याची गरज नाही

राज्याला कुठलाही इशारा नाही, घाबरून जाण्याची गरज नाही

Subscribe

सद्यस्थितीत राज्याला कुठलाही अलर्ट किंवा इशारा नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तिसर्‍या लाटेसंदर्भात राज्याची तयारी पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती, ऑक्सिजन, मेडिसिन तसेच लहान मुलांच्या आरोग्य संबंधीची तयारी पूर्ण केली आहे. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तिसर्‍या लाटेचा अंदाज आणि निरीक्षण सुरू असून त्या अनुषंगानेच मंदिर शाळा उघडण्याचा निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगाने व्यक्त केलाय. पुढच्या महिन्यात साधारण कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे नीती आयोगाचे म्हणणे आहे. तिसर्‍या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नीती आयोगाचा अलर्ट आजचा नाही, केंद्राला आलेले पत्र जून महिन्यातील आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगाने व्यक्त केलाय. आता सोबतच देशाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणार्‍या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या तज्ञांनी देखील एक चिंताजनक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -