घरमुंबईदेशभरात ईव्हीएम 'भारत छोडो' आंदोलन

देशभरात ईव्हीएम ‘भारत छोडो’ आंदोलन

Subscribe

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील इंग्रजांविरुद्धच्या 'भारत छोडो' चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होणार असल्याचे घोषणा

येत्या ९ ऑगस्ट रोजी संपुर्ण देशभरात ‘ईव्हीएम भारत छोडो’ आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील इंग्रजांविरुद्धच्या ‘भारत छोडो’ चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होणार असल्याचे घोषणा करण्यात आली. ही घोषणा ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सध्या केंद्रात असणारे सरकार हे लोकांच्या मतांनी निवडून आले नाही तर ते ईव्हीएम सरकार आहे. या ईव्हीएम सरकारने केलेली चोरी समोर आल्याने या विरोधात संपुर्ण देशभरातील जन संघटना रस्त्यावर असल्याची माहिती राष्ट्रीय जनआंदोलनाचे निमंत्रक रवी भिलाणे व फिरोझ मिठीबोरवाला यांनी दिली आहे.

- Advertisement -

ईव्हीएम विरोधी आंदोलन

९ ऑगस्ट रोजी देशभरातील शेकडो शहरात एकावेळी ईव्हीएम विरोधी आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत दादर येथील चैत्यभूमी ते ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत लाँगमार्च या मार्गाने काढण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणी लाँगमार्चचे भव्य स्वागत

मुंबईकरांच्या वतीने सिद्धिविनायक मंदिर, पोर्तुगीज चर्च, वरळी नाका, हाजी अली या भागात लाँगमार्चचे स्वागत केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -