घरपालघरमेट्रो गावाच्या मागच्या बाजूने न्यावी

मेट्रो गावाच्या मागच्या बाजूने न्यावी

Subscribe

तर याबाबत लवकरात लवकर सर्वेक्षण करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिले आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरातील मेट्रो मार्ग पुढे उत्तनपर्यंत नेण्याचा निर्णय झाला आहे. हे करीत असताना स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून मीरा- भाईंदर मेट्रो राई, मुर्धा, मोर्वा गावाच्या मागच्या बाजूने जाणार्‍या रस्त्यावरून पुढे न्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावच्या मागच्या बाजूने जाणारा १८ मीटरचा रस्ता ३० मीटर करून त्यावरून मेट्रो पुढे न्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. गावच्या मागील बाजूने मेट्रो नेल्यास जेणे करून कोणीही विस्थापित होणार नाही, त्यामुळे भूमिपुत्रांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. तर याबाबत लवकरात लवकर सर्वेक्षण करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिले आहे.

मीरा -भाईंदर शहरातील एमएमआरडीएशी संबंधित विषयांबाबत एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी व आमदार प्रताप सरनाईक तसेच स्थानिक ग्रामस्थ , अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यात मीरा -भाईंदर मेट्रो , विशेषतः गावातून जाणारा रस्ता , त्यांना मिळणारा मोबदला आणि संबंधित विषयांवर चर्चा झाली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक ,माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर , विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर , हेरॉल्ड बोर्जिस, गाव समितीचे अशोक पाटील व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.मीरा- भाईंदर मेट्रोसाठी डोंगरी येथे कारशेडचे आरक्षण डोंगरी येथील सरकारी जमिनीवर टाकले आहे. त्या जागेत ५० ते ६० कुटुंब तिकडे उदरनिर्वाह करतात. अनेक वर्षा पासून राहतात. त्या कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. याच भागात फातिमा चर्च असून ते चर्च ५०० वर्ष जुने असल्याचे पुरावे आहेत. या चर्चच्या नावावर ६४ गुंठे जमीन असून या जमिनीवर फातिमा चर्च आहे. या फातिमा चर्चची जागा असून ती जागा चर्चच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

- Advertisement -

मीरा- भाईंदर मेट्रो मार्गाचे काम करीत असताना गावातील ज्या जमिनी बाधित होतील त्या जमिनींच्या मालकांना जमीन घेत असताना समृध्दी महामार्गच्या धर्तीवर चांगला मोबदला मीरा- भाईंदरच्या भूमिपुत्र ग्रामस्थांना देण्यात यावा अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली. मीरा भाईंदरच्या विकास आराखड्यात उत्तनकडे जाणारा मुख्य रस्ता ३० मीटर रस्ता आहे. त्या ऐवजी तो १८ मीटर रस्ता करावा , अशी मागणी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -