मुंबईसह उपनगरात सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ तसेच नागोठणे, रोहा येथील विविध ठिकाणांवर पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.