भारताने २ एप्रिल २०११ रोजी, आजच्याच दिवशी विश्वचषक पटकावला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंकेविरोधात भारताने अंतिम सामना खेळला होता. १९८३ नंतर तब्बल २८ वर्षांनी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकले होते. कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची ही अखेरचा विश्वचषक स्पर्धा ठरली होती.