घररायगडजिल्ह्यात लाल परीच्या उत्पन्नात दिवसाला ३० टक्के वाढ, दिवसाला सरासरी ४५० फेर्‍या

जिल्ह्यात लाल परीच्या उत्पन्नात दिवसाला ३० टक्के वाढ, दिवसाला सरासरी ४५० फेर्‍या

Subscribe

रायगड जिल्ह्यात कर्जत, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव, महाड व श्रीवर्धन असे एकूण ८आगार आहेत. संपापूर्वी या आठही आगारांत जवळपास २२५२ कर्मचारी होते. ज्यामध्ये वाहक, चालक, प्रशासन, अधिकारी, लेखा, कारकून व यांत्रिक विभाग आदी विविध कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाचे ४० टक्के कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळ ८े आगारांतून एसटीच्या दिवसाला सरासरी ४५० फेर्‍या होत आहेत. शिवाय प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. परिणामी मागील महिन्यात जिल्ह्यात एसटीचे दिवसाला ७ लाख रुपये असणारे उत्पन्न या महिन्यापासून दिवसाला तब्बल १० लाखांवर गेले आहे.

मागील तीन महिन्यांपासून राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यातील काही कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. यामुळे जिल्ह्यात देखील परिवहन मंडळाच्या गाड्या काही प्रमाणात धावताना दिसत आहेत. गाड्यांच्या फेर्‍या हळूहळू वाढत असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने खूप सोयीचे होत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी स्थानकात व रस्त्यावर एसटीची वाट पाहताना दिसत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या देखील भरून जात आहेत. शिवाय कमी पल्ल्याच्या गाड्यांमुळे खेड्यापाड्यातील लोकांची काही अंशी सोय झाली आहे. अनेक लोक स्थानिक व्हॉट्सअप ग्रुप व फेसबुकवर गाड्यांचे वेळापत्रक आवर्जून शेअर करत आहेत. त्यामुळे प्रवासी त्यावेळेस स्थानकात दाखल होत आहेत. शिवाय त्यांना गाड्यांची माहिती देखील मिळत आहे. अतिरिक्त खर्च करून खाजगी वाहनांनी जाणे वाचते. परिणामी प्रवाशांचा वेळ व पैसा वाचत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात कर्जत, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव, महाड व श्रीवर्धन असे एकूण ८आगार आहेत. संपापूर्वी या आठही आगारांत जवळपास २२५२ कर्मचारी होते. ज्यामध्ये वाहक, चालक, प्रशासन, अधिकारी, लेखा, कारकून व यांत्रिक विभाग आदी विविध कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यातील जवळपास ८५० ते ९०० कर्मचारी आजघडीला कामावर परतले आहेत. यामध्ये जवळपास २५० वाहन चालक व वाहक आहेत. आठ आगारांत सर्वसाधारणपणे ४५० गाड्या आहेत. त्यातील ३५० गाड्या संपाआधी वापरल्या जात होत्या. सध्या संपामुळे यातील १०० गाड्या वापरल्या जात आहेत. आणि ८आगारातून रोजच्या तब्बल ४५० फेर्‍या होत आहेत.

अजूनही काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. परिवहन मंत्र्यांनी आता जे शेवटचे आवाहन केले तेव्हा जवळपास १००कर्मचारी हजर झाले आहेत. उपलब्ध संसाधने व कर्मचार्‍यांद्वारे परिवहन सेवा सुरू आहे. प्रवाशांचा प्रतिसाद देखील खूप चांगला.
– अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, पेण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -