घररायगड चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर

 चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर

Subscribe

 मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास

 

अलिबाग: गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होणार असल्याचा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी पळस्पे ते इंदापूर असा पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पनवेल) कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेव, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौर्‍यात कासू, नागोठणे, वाकण फाटा, खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदि ठिकाणी रस्त्याच्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी चव्हाण यांनी केली. या भागातील अनेक परिसरांमध्ये पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याच्या दृष्टीने रेडीमिक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने रस्त्यांमधील खड्डे बुजवितात, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले. केवळ गणेशोत्सव नव्हे तर त्यापुढेही काही काळ रस्ते चांगले राहतील, अशी दुरुस्ती करण्याचे त्यांनी संबंधितास सांगितले. याशिवाय महामार्गाचे राहिलेले काम पावसाळा संपताच तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे, असेही निर्देश संबंधित विभागाला चव्हाण यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -