घरठाणेभाजप, शिंदे गट आणि आता मनसे हे तिघे एकत्र असले तरी उद्धव...

भाजप, शिंदे गट आणि आता मनसे हे तिघे एकत्र असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्यावर भारी !

Subscribe

उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांचा राज ठाकरे यांच्या टिकेनंतर टोला

भाजप, शिंदे गट यांच्यासह राज ठाकरे यांनी  ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावच विरोधकांना भारी पडत असून हे नाव घेतल्याशिवाय विरोधकांना झोपच लागत नाही, असा सणसणीत टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी असून महाराष्ट्रातील जनतेची साथ उद्धव ठाकरेंना आहे,असेही घाडीगावकर यांनी म्हटले आहे.

भाजप, मनसे, शिंदे गट हे सगळे मिळून अंगावर आले तरी बाळासाहेबांचा वाघ उद्धव ठाकरे हे झुकत नाहीत, झुकणार नाहीत, असे सांगताना संजय घाडीगावकर यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शिवसेनेला सोडून ४० जण निघून गेले ते सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी निघून गेले.पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांनी बळकावले. ज्या शिवसेनेने त्यांना मोठं केलं त्याच शिवसेनेच्या फुटीस ते कारणीभूत ठरले. राज ठाकरे या शिंदे गटाचे समर्थन करताना या फुटीस उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवतात,मात्र राज ठाकरेंना त्यांचे १३ आमदार का सोडून गेले?याचे उत्तर मात्र राज ठाकरे देत नाहीत. गेल्या काही वर्षात मनसे मधून अनेक नेते बाहेर का पडून जातात? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं.नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले नसते असं राज ठाकरे म्हणाले. मात्र तेच नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले. मंत्री झाले आणि काँग्रेसला सोडून निघून गेले. स्वतःचा पक्ष स्थापन करून त्या पक्षातून देखील स्वतः नारायण राणे बाहेर पडले आणि भाजपमध्ये दाखल झाले. मग याला पण उद्धव साहेब जबाबदार आहेत का? अशा राण्यांची बाजू राज ठाकरे घेतात आणि उद्धव यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. यातूनच यांचे राजकारण लक्षात येते, असा सणसणीत टोला संजय घाडीगावकर यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -